
गाणे म्हंटले कि मन तन त्या तालावर झुलू लागते .....प्रत्येक गाण्याचा आपण एक भाग आहोत असेच काहीसे वाटते... आयुष्यातल्या चांगल्या वाईट प्रसंगावरून, बऱ्या-वाईट अनुभवावरून गाण्याची निवड आपोआप होवून जाते... वयोमानानुसार हि गाण्याची पसंती नोंदवली जाते.. आता लहानपणी आपण राजा राणीच्या आणि परयाच्या कथा, पावसाची गाणी यातच मन रमलेले असायचे. आयुष्य चांगल्या अनुभवावर आहे तोपर्यंत तरी साधी आणि सरळ गाणी आवडतात.... मस्तइ धिंगाणा असेल तर धमाल धिंगाणा असलेली गाणी आवडतात. प्रेमात पडले कि जरा हलकी मनाला भावणारी गाणी आवडतात मग असे कधी अशी गाणी कानावर पडली कि नकळत आपण आठवणीच्या झुल्यावर झुलू लागतो...मग आपल्या गाण्यांच्या आवडीवरून आपल्या मनाचे प्रतिबिंब झळकू लागते... आणि कधी कधी समोरच्या माणसाला आपल्या मनाचा थोडासा कानोसा घेतो. प्रेमभंग, विश्वासघात इति... असा काही अनुभव असेल तर त्याला साजेसे गाणेच आवडते... मग ते दिवसातून १०० वेळा ऐकले तरी कमीच वाटते.... मग थोडा काळाची सावली सरू लागते.... वेळ पुढे ढकलली जाते.... अन असेच अचानक त्या गणाचे बोल कानावर पडतात.... हृदयाची स्पंदने वाढू लागतात... श्वासाची गती वाढू लागते.. पोटात भीती दाटून येते ... आणि आठवणी परत जाग्या होवू लागतात.. हलकेच डोळ्यातून पाणी येवू लागते... एक एक गेलेला क्षण डोळ्यासमोर धडधड पुढे सरकू लागतात... त्याचे किंवा तिचे बोलणे, हसणे, भेटणे, डोळे, शेवटची भेट... सर्व काही डोळ्यासमोर ठाण मांडून बसते...अन मन विचार करू लागते का झाले असे.....
हि गाणी असतात मात्र विचित्र, कधी प्रेमळ, कधी हवीहवीशी वाटणारी... मनातील भावना व्यक्त करणारी, मग वाटते हे गाणे अगदी माझ्यासाठी आहे... अगदी मनाचा आरसा होवून आपल्या मनातील भावना आपल्याच दाखवू लागतात.... मोरपिसासारखी मनावर हळुवार फिरून जातात..... या गोष्टीला कोणीच विरोध करू शकत नाही... लहानापासून अगदी नव्वदीतल्या आजी आजोबानासुधा आपल्या आठवणीत घेवून जाणारी गाणी... मनाला भावणारी... हळुवार गालावर हसू आणणारी तर कधी नकळत डोळ्यातून अश्रू आणणारी.... मनातील गाणी...